माझे अलिबाग पर्यटन
दोन वर्ष घरात ( नाईलाजाने ) राहून अगदी
कंटाळा आला होता. आता कुठे कोविड बंधने शिथील होतात बघून आम्ही अलिबागला जायचे
ठरविले. माझी, पती आणि मुलीची सुट्टी, गर्दी, रहाण्याची व्यवस्था, सरकारी बंधने
इत्यादी अडथळे पार करून एकदाचे दस-याच्या दिवशी अलिबागला कॅटरमन बोटीने आम्ही सीमोल्लंघन
केले. बरेच दिवस समूद्र पाहिला नव्हता,
अनायासे सगळे जुळून आले.
समुद्राच्या
समोर सरकारी विश्रामगृह “तुषार” असल्यामूळे 3 दिवसात आरामात खाणे, पिणे, फिरणे आणि
थकून भागून झोपणे इत्यादी मजा चालू होती. त्यात किल्ले कुलाबा, जंजीरा नुकतेच खुले
झाले असल्यामूळे माफक गर्दीत छानपैकी बघून झाले. अलिबाग, किहीम, काशीद, मांडवा, नागाव,
मुरुड, रेवस, वरसोली, आवास चौपाट्या यथेच्छ फिरून झाले, काढले.
बिर्ला मंदीर, अलिबागमधील बालाजी आणि विठ्ठल ररुमाईचे मंदीर बघितले.
सोबतीला शाकाहारी-मासांहारी जेवण होतेच.
समूद्र समोर असल्याने सकाळ, संध्याकाळ,
रात्री फिरायला मजा येत होती. एकूण
प्रवास आणि पर्यटन यशस्वी होऊन रविवारी संध्याकाळी बोटीने मूंबईत परत आलो.
अशा या अलीबागला आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी 5-6 वेळा गेलो तरी कंटाळा येत नाही. गावी जाऊन आल्याचे समाधान मिळते. किमान 3-13 माणसे अशी एके काळी 20 वर्षापूर्वी एकत्र गेलो होतो तेव्हा तर खूप धमाल आली होती. त्यावेळी आमचा संसारसुध्दा “हम दो हमारी एक” अशी होती. आताही तसेच होते. काळाच्या ओघात ब-याच गोष्टी बदलतात. त्यावेळी किल्ल्यात जाण्यासाठी शिडाची बोट, घोडा गाडी होती. आता वॉटरबोट व नवनवीन साहसी खेळ, ट्रेक्टर, डबल सायकल, उंट, घोडे अशा मंडळींची भर पडली होती. सन 2019 मध्ये आम्ही सर्व बहिण-भाऊ, भाऊजी-वहीनी आणि त्यांच्या आई व सासू असे एकत्रित ट्रिप केली होती,त्याच्या आठवणी ताज्या होत्याच.
आपल्याकडेही अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत ती मनावर घेतली तर विकसित होऊ शकतात. आपल्याला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्यस्थळांचा पर्यटनांच्या दृष्टीने विकास होणे हीच काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?
छान अवलोकन..
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteNav kalale tar anand hoil👍
Deleteमाहितीपूर्ण लेख. पर्यटकांसाठी केलेल्या सूचनांचे पर्यटकांनी पालन करणे आवश्यक आहे तसेच नैसर्गिक सौंदर्यस्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे ह्या विचारांशी मी सहमत आहे. लेख आवडला.
ReplyDeleteDhanyawad 🙏
DeleteNav lihile tar jast bare vatel👍
Deleteफारच सुंदर लिहिले आहे..
ReplyDeleteDhanyawad 🙏 Bhau
DeleteDhanyawad 🙏 Bhau
ReplyDeleteअशा पर्यटनस्थळांचा विकास करायचा झाल्यास तिथे तिकीट लावणे आवश्यकता आहे प्रत्येक पर्यटकाला तिकीट काढून ठराविक वेळेत शिस्तबध्द सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत . मग बघा कशी प्रगती होते. बरेच छान छान पर्यटन स्थळ आहेत इंटरनॅशनल लेवल ची सुद्धा तिथे तिकीट लावून पर्यटकांना आत सोडतात त्या पद्धतीने केल्यास भरपूर विकास होईल आणि बरेच लोक मग ये-जा करतील. प्रत्येक रविवारी सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आनंद लुटायला युवा पिढी समुद्रकिनारी मजा करायला येऊ शकते. खूप छान लेख आहे खरच असे केल्यास शासनाकडे पैसे आल्यासत्याची डागडुजी वगैरे नियमितपणे केली जाईल
ReplyDeleteDhanyawad 💓🙏
ReplyDeleteAaplya active participation baddalpan.👍
hum do humare ek; ya veli `ti` rahun geli !
ReplyDeleteपुनम भांगले
ReplyDeleteती हरवलेली आहे. शोधून दिल्यास रोख इनाम देण्यात येईल.
आपण तीला पाहिले का.
नुकत्याच आलेल्या वृत्ता नुसार ती अमेरिकेत दिसली आहे.