Posts

Showing posts from May, 2021

भावतरंगची जन्म कथा

              दि. 16 मे, 2021 रोजी “भावतरंग” ई-बुक स्वरुपात प्रसिध्द झाले, त्याची ही मुळ कथा. खरे तर गेले 10-15 वर्ष  मी लिहित आहे. मधून मधून वर्तमानपत्रे, मासिके  आणि समाजाच्या पुस्तकात मी माझे लेख प्रसिध्द करण्यासाठी पाठवत असे. मात्र एवढे 105 लेखांचे पुस्तक होईल असे वाटले नव्हते. म्हणतात ना “हम लिखते गये और किताब बनती गयी” या धर्तीवर, वाचकांसाठी आज एक कायमस्वरुपी ठेवा उपलब्ध करण्याचा एक प्रयत्न केला याचा मला आनंद होत आहे.                 पुस्तक छापण्यामागे माझे बहिण-भाऊ, पती आणि इतर सर्वजण माझ्यापेक्षा जास्त उत्सुक होते. खरंतर गेल्या वर्षी प्रकाशकाकडे पुस्तकस्वरुपात छापण्यासाठी लिखितस्वरूपात दिलेले होते. परंतू कोविडजन्य परिस्थितीमूळे   छापणे शक्य झाले नाही. अन्यथा मागच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित झाले असते. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते, तेच याही बाबतीत खरे झाले. पहिल्यांदा मला वाईट वाटले, काही तरी करावयास गेले आणि अनपेक्षितरीत्या सर्वच काम ठप्प झाले...

सध्या काय करते मिरांडा?

           अग, ऐकलंस का? 27 वर्षाच्या लग्नानंतर गिलगिटराव आणि मिरांडाबाई वेगळ्या झाल्या. हो त्यात काय नवल! आपली तर 54 वर्ष झाली, मी म्हणून तुम्हाला सांभाळून घेतलं हो, नाही तर दुसरी कधीच सोडून गेली असती. (अस्मादिकांनी लगेच हात धुवून घेतले).             अग, तुझे वय 55 आणि लग्नाला 54 कशी होतील?  अहो, पहिली गुलाबी 2 वर्ष सोडली तर आपली 27 वर्ष पुर्ण झाली आणि एक एक वर्ष 2 वर्षाप्रमाणे गेले म्हणून 54 वर्ष असा माझा हिशोब. हा आमचा सुखसंवाद भल्या सकाळी पार पाडला. बाकी काही म्हणा आपल्याकडे लग्नाची जोडपी 60-70 वर्ष नंतर सुध्दा गुण्यागोविंदाने रहातात हे या मिरांडा आणि गिलगिटरावांना कोण सांगणार?                  गंमतीचा भाव सोडा पण खरे वैवाहिक आयुष्य 27 वर्षानंतर सुरू होते, असे मला वाटते म्हणजेच वयाच्या आणि लग्नाच्या दोन्ही अर्थाने.   तो पर्यंत इतर जबाबदा-या नातेवाईक, मुले, नौकरी आणि घर इत्यादी मुळे स्वत:कडे व जोडीदाराकडे बघायला वेळच मिळत नाही. 27 वर्षानंतर मात्र हळूहळू स्थ...

देव ही संकल्पना

               देव ही संकल्पना आहे की नाही याबाबत ब - याचवेळा मतभेद असतात . आहे म्हणणारे आणि नाही म्हणणारे .  मानला तर देव नाहीतर दगड . दगडाला “ शेंदुर फासला की झाला देव “ असे काही जणांचे म त असते . आज लोकांचा देवावरील विश्वास दुर्मिळ होत चालला आहे. देव प्रत्य क्ष प्रकट होऊन दिसत नाही. देव कुठून कसा आणि कोणत्या रुपात दर्शन देईल याचा अनुभव घेतल्याशिवाय सिध्द करणे शक्य नाही.                  मुळात देव म्हणजे काय ?   आपल्यातलेच चांगले गुण जोपासणे म्हणजे देवत्व.   देव आणि वेगळा काय असतो ? काहीजण माणसांत, मंदिरात , मुक्या जनावरांमध्ये , गरजू लोकांमध्ये   शोधतात तर काही जण मूर्तीरुपी देवाचे अवास्तव महत्व वाढवून वेगवेगळ्या रुढी , परंपरा आणि अंधश्रध्दांना बळी पडतात . खरं तर देव आपल्या मनात आणि वागण्यात दिसावयास हवा . पण आपण देव शोधतो बाहेर . “ देव नाही देव्हा - यात, आहे आपल्या मनात...

मुली येती घरा, तोची दिवाळी दसरा

              मध्यंतरी व्हॉटसअपवर “एकतरी मुलगी असावी”  अशी कविता आल्यावर मला माझ्या भाग्याचा हेवा वाटला. देवाने मला दोन मुली दिल्या. आज दोघी बाहेर असल्या तरी त्यांचे बालपण, शाळा, कॉलेज, नौकरी, त्यांच्या स्वभावा तील विरोधाभास असा 27 वर्षापुर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो.          जेव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा बाबांपासून सगळे नातेवाईक खूशीत होते. हळूहळू तिच्या बाळलीला आणि आजोबांशी मैत्री यामूळे दिवस कसे गेले ते कळले नाही. बाबा आणि आजोबांचा तिला जास्त लळा होता. “एकसे भले दो” या न्यायाने दुसरा चान्स घेतला आणि मुलगी म्हणून पुन्हा एक परी जन्माला आली. बरेच जण मोठया मुलीला माझ्या सासूसारखी आणि दुसरीला माझ्या आजीसारखी आहे असे म्हणतात.               दोघे एकमेकांना सांभाळून घ्यायच्या , तशाच भांडणपण करायच्या. शाळेत जाताना, खेळायला जाताना 4 वर्षाचे अंतर असूनही दोघी एकत्र जायच्या आणि लोकांना दोघी मैत्रीणीच वाटायच्या. मोठ्या झाल्यावर ...

सेवानिवृत्ती

                  माझ्या एका स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या मैत्रिणीचा निरोप समारंभ होता .   थोडक्यात तिचे भाषण असे होते . “ आज इतक्या जणांनी मी केलेल्या कामाचे कौतुक केले . या व्यवस्थेची छोटीशी भाग होऊ शकले.  प्रामाणिक काम केल्याचे समाधान व लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली या बद्दल मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते. कामातून जरी स्वेच्छानिवृत्ती घेतली असली तरी पुढील आयुष्य भरभरुन जगण्याची ही एक संधी आहे असे मला वाटते”.                सेवानिवृत्ती हा एक आयुष्यातील नवीन टप्पा. स्व: चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होऊन त्या दिशेने आनंदाने मार्गक्रमण करणे हेच खरे सेवानिवृत्तीनंतरचे काम. एकदा का हा शोध लागला की, उर्वरित आयुष्य जगणे सुखाचे ठरते.   पुर्वी हा एक कंटाळवाणा टप्पा वाटायचा कारण पैसा आणि संसाराची जबाबदारी यात पुरूष एवढा मग्न असायचा की सेवानिवृत्ती कधी आली हे कळायचे नाही.   येणारा पैसा थांबल्यामूळे पुढे काय होणार आणि दुस-यांवर अवलंबून रहावे लागणा...

मित्रांगण

             मित्र आणि त्यांचे अनेक ग्रुप्स या सर्वांना मिळून मैत्रांगण असे नाव द्यायला हरकत नाही. बालपणीचे, कॉलेजचे, ऑफिसमधले, दैंनंदिन प्रवासातले, सामाजिक माध्यमावरचे असे अनेक ग्रुप असतात. विविध क्षेत्रातले प्रत्येक जण वेगळा.  प्रत्येकाला एकमेकांबद्दल वाटणारी ओढ प्रत्यक्ष न भेटताही मैत्रीचे स्नेहाचे चौकशीचे नाते कधी फुलत जाते ते कळत नाही. काही दिवसांनी याची सवय होऊन जाते.             अचानक काही तरी संदर्भ लागतो आणि आपल्याला त्यांचे वेगळेपण दिसून येते. त्यात इर्षा किंवा आगळिक अशी नसते त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जायला होते. मित्र-मैत्रिणींनी अंगण कायम भरलेले असावे असे वाटते परंतू असे नेहमी शक्य नसते. विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत.  सामाजिक माध्यमांमूळे अगदी वयाच्या 50व्या वर्षीपण वाढदिवसाला एकत्र भेटणारे आहेत. ठरवून योजना आखून आश्चर्यचकीत करणारे, दुस-यांच्या आनंदात स्वत: आनंद शोधणारे, एकमेकांची दु:खे जाणून घेणारे त्याच्यांवर फुंकर किंवा उपाय सुचविणारे. अवगुणांचे गुणात रुपांतर करणारे, ...

अर्धांगिनी

            “ अर्धांगिनीला ” पत्नी हा शब्द अगदी सौम्य वाटतो. संसाररुपी नाटकातील सर्वात शक्तीशाली पात्र असून तिचे असणे यावर तिचा नवरा अस्तित्वात येतो.  त्याच बरोबर इतर अनेक पात्रे नावारुपास येतात. नव-याला बायकोपेक्षा जास्त कोणी जपू शकत नाही. त्याचे सगळे गुणदोष पोटात घालून सर्वस्वी साथ देणारी ती अर्धांगिनी. पुराणातसुद्धा सती सावित्री, अनुसूया, मंदोदरी, सिता यांच्या महान पतिव्रता म्हणून उल्लेख आढळतो. ज्यांच्यामूळे गेलेले प्राण , वैभव परत मिळाले .  अर्धांगीनी संसारात मार्गदर्शकाची भुमिका बजावत असते. त्यामुळे ती कोणत्याही संकटावर मात करू शकते.             काही वर्षांनी नवरा-बायको एवढे एकमेकांमध्ये एकरूप होतात की त्यांचे एकमेकांशिवाय अस्तित्व उरत नाही.  सगळी माहेरची नाती सोडून ती नव-या सोबत येते आणि शेवटच्या श्वासापर्यंत नव-याची साथ देते.  पत्नी म्हणजे अनेक नात्यांचे भांडार आहे. सेवा आणि प्रेम ती आई बनून करते. पित्याप्रमाणे घराचे हित साधत असते. झालेल्या चुकांवर पती व मुलांना रा...

अनुत्पादक मालमत्ता

               अनुत्पादक मालमत्ता म्हणजे ज्याद्वारे कोणतीही नविन प्राप्ती होऊ शकत नाही किंवा कालपरत्वे कमी होत जाणारे मालमत्तेचे अधिमुल्य ( उपयोगिता आणि आर्थिक मुल्य).   आर्थिक विश्वात स्थावर मालमत्ता असणे खूप महत्वाचे असणे . खेळते भांडवल आणि स्थावर मालमत्ता कोणताही व्यवसाय चालण्यासाठी महत्वाचे असते . पुर्वी मुलगी देताना मुलाच्या पगारापेक्षा मोठे घर , जमीन , सोने , नाणे बघून देत असत . हळूहळू हे कमी झाले . अजूनही गावची संपत्ती एक जमेची बाजू समजली जाते . योग्य आहे म्हणा ते !            काही ठिकाणी जशा बॅंका , इतर आर्थिक व्यवहार करणा - या संस्थांना या अनुत्पादक मालमत्तांमूळे भुर्दंड सोसावा लागत आहे . या मालमत्तांमधून काही प्रमाणात लाभ मिळत असला तरी कालांतराने मालमत्ते मधील भांडण तंटा आणि व्यवर्हायता लक्षात घेता . डोंगर पोखरून उंदीर काढल्या सारखे होते . त्यामुळे या अनुत्पादक मालमत्तांचे करायचे काय हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे .      ...

मुलांचा दृष्टीकोन

        हल्लीची पिढी कसा विचार करते ते कधीकधी आपल्याला कळतच नाही . प्रत्येक नवीन पिढी आधीच्या पिढीपेक्षा हुशार , सुधारित मतांची , आधुनिक विचारसरणीची असणार हे नक्की . कधी कधी तरूणाई काय काय करते थक्क व्हायला होते . जसे परदेशी जाऊन , शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होणारे आहेत .  इथे कष्ट करण्याची तयारी नसते . काही सामाजिक कामात वाहून घेणारे आहेत . मुलांना जन्म दिल्यावर स्वातंत्र्यावर गदा येते म्हणून लग्नच न करणारे आहे . लग्न न करता मुले दत्तक घेऊन सांभाळ करणारेपण आहेत . करीअर , पैसा याच्यामागे लागल्यामूळे मूल देऊ शकत नाही मग सरोगसी करून मातृत्वाचा आनंद मानणारेपण आहेत . उद्याचे कोणी बघितले म्हणून उधळपट्टी   करणारे आहेत तर दिवसेंदिवस वाढणारी महागाई बघून वेळीच नियोजन करणारे आहेत .                     नौकरी , मुल आणि घर यामध्ये होणारी घुसमट टाळून स्वत:साठी जगणारे आई - बाबा दिसतात . मुद्दाम नौकरी सोडून घरात रहाणारे आई किंवा बाबापण दिसतात . मुलगा किंवा मुलीचा जन्म होतानाचा आ...

घसारा (Depreciation)

         औद्योगिक क्षेत्रात घसाराचे महत्व खूप असते . स्थावर मालमत्त्ता , मोठी यंत्रे , इमारत इत्यादी वस्तूंची कार्यक्षमता कालक्रमानुसार   कमी होत जात जाऊन त्याचे मुल्य कंमी होत जाते . कार्यालयीन आणि उत्पादनासाठी होणारा वापर , नैसर्गिकरीत्या होणारी झीज आणि   नवीन   शोधामूळे जुन्या मशिनचे अद्ययावतीकरण किवा पर्याय शोधणे अशा अनेक कारणामूळे सदर मालमत्ता ठरावीक कालावधी नंतर निरुपयोगी ठरते . त्यासाठीची तरतूद म्हणून घसारा देय करून नफ्यातून वगळला जातो . यात घसारा रक्कम बाजूला काढून तशी भविष्यकालीन गुंतवणूक केली जाते .  जेणेकरून नफ्यावर अधिक ताण न पडता योग्य वेळी सदर रक्कम भविष्यात पर्यायी वस्तू घेण्यासाठी उपयोगी ठरते .  असा हा घसारा आणि त्याचा कालावधी हा निश्चित करून त्याप्रमाणे तरतूद ठरविली जाते .            मानवी मशीन   या सगळ्याच्या पल्याड असते अशी कोणतीही तरतूद आपण सहसा करत नाहीत . औद्योगिक क्षेत्राप्रमाणे मानवी मशीनसाठी चालू उत्पन्नातून भविष्यकालीन गरजेसाठी आणि आकस्मिक संकटासाठी  ...

पार्टनर

            नुकताच   व . पु . काळेंचा जन्मदिवस फेसबुकवर साजरा झाला आणि मी पुन्हा एकदा 30 वर्ष मागे गेले .  मला वाचण्यासाठी कादंबरीपेक्षा कथासंग्रह जास्त आवडतात . त्यामुळे वपुं चे कथासंग्रह आणि पत्रलेखन मला खूप आवडायचे . वपुंचे लेखन त्यावेळी थोडे अगम्य वाटायचे . कदाचित वयाचा अपरिक्वपणा असावा .          आर्थिक क्षेत्रातले शिक्षण असल्यामूळे तसा माझा परिचय “ भागीदारी ” या विषयाचा परिचय कॉलेजात झाला . भागीदारीचे विविध प्रकार जसे की , क्रियाशिल , नामधारी आणि झोपलेला (Sleeping Partner) असे आम्ही शिकलो .   प्रत्यक्ष आयुष्यात भागीदार ( पती किंवा पत्नी ) कसे वागतात हे आपल्याला अनेक कथांमधून कळते . खरंच भागीदारी एवढी अवघड असते का ? प्रत्येक व्यवसायाचे , गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात . आपण नेहमी तोट्यांचा का जास्त विचार करतो ?   वपुंच्या कथांमधील अनेक कथा अंतर्मूख करायला लावतात . त्यांची तत्वज्ञानपर वाक्ये आणि परिस्थिती समजायला वाचणारापण तेवढा प्रगल्भ   लागतो . त्यामुळे लग्नाआधीची व...