सुरक्षा कवच
“जिंदगी साथ भी..जिंदगी के बाद भी.”हम है हमेशा! अशा अनेक जाहिराती बघुनच तुम्ही मोठे झाले असाल ना? एकेकाळी जीवनविम्याला पर्याय नव्हता. मराठी अभिनेत्री या जाहिरातीत असल्यामुळे जास्त जवळीकीची वाटायची. आता अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. वेगवेगळ्या योजना येत असतात. तुलनात्मक फायदे/तोटे लक्षात घेऊन प्रत्येकाने “जीवनवीमा” घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे. असे कळते कि,एकुण लोकसंखेच्या फक्त 10%लोकच वीमाधारक आहेत. म्हणजेच अजुनही म्हणावी तेवढी जागरुकता दिसुन येत नाही. तसेही कंपन्या आपापल्या कर्मचारी/अधिका-यांची विमा काढतच असते. नोकरी सोडल्यानंतर कधी ही रक्कम मिळते तर बहुधा मिळत नाही. अपघात कर्तव्य बजावत असताना झाल्यासच काही ठिकाणी लगेच मिळतो. त्यासाठी सरकारने विमाधारकांना प्राधान्य तत्वावर उपचार मिळावेत यासाठी दवाखानेपण निर्माण करुन कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत. श्री मंत माणसांपासुन गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी हप्ता आणि आयुष्य यांचे मुल्यांकन करुन त्याप्रमाणे आपले आयु...