Posts

Showing posts from August, 2021

अथांग सागर

Image
           नुकतीच “नारळी पोर्णिमा” झाली आणि सगळ्यांचे समुद्राबद्दलचे प्रेम उफाळून आले. माझा एक नाजूक कोपरा समुद्रासाठी राखीव आहे असे म्हणावयास हरकत नाही. कोणतेही समुद्र किना-यास भेट देणे मी सहसा चुकवत नाही. कारवार (कर्नाटक)मध्ये गेल्यावर “कारवारचा समुद्र” हा भेट देण्यासाठी एक अविभाज्य घटक असतो. विविध समुद्र किनारे आपआपला परिचय वेगवेगळा देत असतात. मुंबई, कारवार, गोवा, गणपतीपुळे, रत्नागिरी, अलिबाग, मुरूड, जंजीरा, गोकर्ण, दमण, गुजरात अशा अनेक समुद्र किना-यांचे दर्शन बघतच रहावेसे वाटते. विशेषत: सुर्योदय आणि सुर्यास्त पहाण्यासारखा असतो. त्यावेळी सगळा आसमंत एकदम शांत असतो. फक्त समुद्राची लाटांची गाज तेवढी ऐकू येत असते. ध्यान लागणे किंवा समाधी अवस्था प्राप्त होणे यालाच म्हणत असावेत. समूद्र किनारी फिरणे, लाटा पहात संध्याकाळ घालविणे, शिंपले गोळा करणे, वाळूचे किल्ले बनविणे, कुर्ल्यांच्या मागे धावणे इत्यादी अनेक उद्योग अनेकांचे चालूच असतात.          कोकणवासी आणि कोळी बांधव यांना समुद्र आपला सखा वाटतो. त्याची पुजा करून ते नारळी पोर्णिमेच्या द...

बायका कुठे काय करतात?

                सर्वसाधारणपणे सगळ्यांचा गोड गैरसमज असतो, बायका कुठे काय काम करतात? पण खोलात जाऊन विचार केला तर सगळे काही बायकाच करतात.   बघा हं, बाई नसलेले घर आणि बाई असलेले घर याच्यातील फरक कळतोच ना!   सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यात जास्त काम कोण करत असेल याचा कोणी विचार केला आहे का? काय करीत नाही बायका? आई, बहीण, बायको आणि नंतर मूलीच्या स्वरूपात स्त्रिया प्रत्येक पुरूषाच्या जीवनात येतच असतात.              नौकरीवाली किंवा गृहिणी असो, सगळ्या कामाची जबाबदारी स्वता:ची समजून ती वागत असते. म्हणूनच इतरांना (मूले व नवरा) बिनधास्त आपआपली कामे करू शकतात ना?   तीच बाई जेव्हा नौकरीवाली असते तेव्हा थोडीफार कामे ती इतरांना हस्तांतरीत करु शकते. (पाळणाघर, स्वयंपाकीण किंवा घर सांभाळणारी) मात्र अंतिम जबाबदारी तिचीच असते. याचाच ताण स्त्रियांना जास्त होतो. तिचे दुर्लक्ष झाले की सर्व घराला त्रास होतो म्हणून तिला कायम जागरुकच रहावे लागते. ठराविक रितीरिवाज व परंपरा पाळायच्या, आई व सासू यांच्या देखरेखीखाल...

आहे मनोहर तरी …

Image
              30 वर्षापुर्वी हे पुस्तक जेव्हा प्रसिध्द झाले तेव्हा ब-याच क्रिया- प्रतिक्रिया उमटल्या असतील यात वादच नाही. एका प्रसिध्द लाडक्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू जगासमोर मांडण्याचे धैर्य खुद्द त्यांच्या पत्नीने मांडले म्हणजे मोठेच काम होय. विशेष म्हणजे पु.लं.देशपांडेचाही यात सहभाग होता. त्यांना कोणताही कमीपणा किंवा अपमान वाटला नाही हे विशेष. तेवढी प्रगल्भता दोघांमध्येही असणार म्हणूनच शक्य झाले ना! त्यांचे वेगळेपण नक्कीच कौतूकास्पद आहे.   आज याचा संदर्भ लक्षात घेतला तर अनेक स्तरांवर स्त्री-पुरुष, नवरा-बायको यांचे सबंध अधिकच तणावाचे आणि संघर्षाचे दिसून येतात.        आज स्त्रिया स्वता:च्या पायावर उभ्या आहेत. त्यांना हवे ते स्वातंत्र्य दिले जाते अगदी माहेरहून आणि सासरहूनसुध्दा !   मग काय कमी आहे? काय कारणे असावीत? कुठेतरी शारिरीक, मानसिक, आर्थिक मर्यादा जाणवतात का? एखादे घर बाहेरून एकदम सजलेले असेल तरी आतून मजबूत असेलच असे नाही असे म्हणता येईल का? मिळालेले स्वातंत्र्य सांभाळण्याचे दडपण आहे का? शिक्षण, स्वातंत्र्य आणि ...

मानवी मनोगुणांचा शोध घेणा-या कथा (Chicken Soup for the Soul)

Image
           साधारण 8-10 वर्षापूर्वी मला “Chicken Soup for the Soul” या पुस्तक वाचनाचे वेड लागले ते अजूनही कायम आहे. कितीतरी जणांना बक्षीस, भेटवस्तू म्हणून देण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग झाला. त्या पुस्तकातल्या छोट्या छोट्या गोष्टी मुलींना वाचून दाखवयाला ब-या पडल्या. त्यानंतर 2-3 वर्षांपूर्वी जेव्हा मी फेसबुकवर कार्यरत झाले तेव्हा सर्व प्रथम “Chicken Soup for the Soul” या प्रकाशनातर्फे छापणा-या चित्रांसकट सुविचार मी शेअर करु लागले.   तेव्हा बहिणींची आणि मैत्रीणींची उत्सुकता चाळवली गेली.   एवढे काय तू शेअर करतेस? थोड्याच दिवसात फेसबुकवरून तुला बोलावून सत्कार करण्यात येईल - इति नवरा. अशी अस्मादिकांनी चेष्टा करून झाली   म्हणून आज याच विषयावर हा लेखन प्रपंच.         आपला सर्वसाधारण गैरसमज असा असतो की, भारतीय तेवढे प्रेमळ, भावनाशील, दयावान वगैरे मात्र या पुस्तकात परदेशातील मुले स्त्रिया, पुरूष, शिक्षक, विद्यार्थी, आई व मुले व पिता यांचे एकमेकातील जिव्हाळ्याचे संबध, भावनिक संघर्ष आणि त्यातून निघालेले किंवा काढलेले जीवनाचे सार जे ...

स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव

Image
                    स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ? प्रत्येकाला हवी असलेली तरीही ती नेमकी काय आहे याची माहिती नसलेली संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य मिळाले की मिळवले? हा आज 74 वर्षानंतरचाही अनुत्तरीत प्रश्न आहे. स्वतंत्र असणे याचा अर्थ स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे सामर्थ्य असणे, स्वत:चे रक्षण स्वत: करण्याची क्षमता असणे म्हणजे स्वातंत्र्य असा होवू शकतो. व्यक्तीस्वातंत्र्य हे तर संघर्षाचे मुलभूत कारण   आहे.   विचार, अस्मिता, पंथ,वर्ग, संस्कृती अशा अनेक अंगानी स्वातंत्र्याचा विचार केला तर संघर्ष निर्माण होण्यास कारण मिळते. समता, समानता, अधिकार आणि हक्क या गोष्टींशी स्वातंत्र्य जोडणे अपेक्षित होते.                आज आपण स्वातंत्र्याची 74 वर्ष पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत.   आता हीच वेळ आहे की आपल्या स्वातंत्र्याबाबत सिंहावलोकन करण्याची! बरेच पाणी डोक्यावरून गेल्यावर कधीतरी आपण जागृत होतो, तसे आपण झालोत का? की अजूनही मतभेद आहेत? प्रमाण कमी अधिक आहे की तसा आभास...

दिव्या दिव्या दिपत्कार ..

Image
                 लहानपणी रोज संध्याकाळी दिवा लावल्यावर आम्ही सगळेजण “शुभं करोति कल्याणम”, पाढे आणि “दिव्या दिव्या दिपत्कार” म्हणत असू. आजही दिवा लावताना त्याची आठवण येते. मुलींना शिकवताना आम्हीपण म्हणत असू. आता सगळेजण मोठे झाले पण दिव्याचे महत्व कमी झालेले नाही. देवाकडे, तुळशीकडे किंवा गावाकडील घरात दक्षिणेकडे संध्याकाळी दिवा लावतात तेव्हा एक वेगळेच मानसिक समाधान मिळते. खरंतर वेगवेगळी रोषणाई, आकर्षक दिव्यांची सजावट करत असतात. पण जी दिव्याची रोषणाई मनाला शांतवते त्याचे महत्व दिवाळीत किंवा अनेक शुभ प्रसंगी आपल्या संस्कृतीत महत्वाचे मानले जाते. दक्षिणेकडच्या देवळात गेलात तर गाभा-यात तुम्हाला फक्त समईचा प्रकाश दिसेल तिथे कृत्रिम लाईटस लावत नाहीत. अशा वेळी मंद प्रकाशात समईच्या उजेडात मुर्तीचे रुप विलोभनीय दिसते शिवाय दाग-दागिनेपण जास्तच खुलून दिसतात. मंगलप्रसंगी औक्षण करणे हे आपल्याकडे महत्वाचे मानले जाते.          अशा या दिव्याचे महत्व जाणूनच आषाढ महिन्यात शेवटच्या दिवशी “दिव्याची अमावस्या” साजरी करत असाव...

जीवन एक खेळ

             यावर्षी नुकताच ऑलिंपिक फिवरने जोर धरून भारतात सगळीकडेच जोश अनुभवला. अनेक कथा,   खिलाडूवृत्ती, जिद्द, टोकाचे परिश्रम यांचे अभूतपुर्व दर्शन घडविले. एकूण 7 पदकांची (1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉंझ) कमाई आपण केली. यातून आपण काय शिकलो हे महत्वाचे!   या निमित्त मला पडलेले काही प्रश्न! (अ)   मोठ्या शहरांपेक्षा लहान गावात अनेक हिरे दडलेले असतात. विपरीत परिस्थितीतसुद्धा अनेक अडचणींवर मात करून ते त्यांचे अपेक्षित ध्येय गाठतात. (ब)   वैयक्तिक स्वार्थापेक्षा सांघिक यश महत्वाचे. “माझा देश आणि माझा खेळ”हे एकच ध्येय सगळ्या समोर होते. (जे इतर वेळी आपण का दाखवत नाही?)   (क) सगळ्या सुविधा असतानासुध्दा शहरी मूले खेळाकडे दुर्लक्ष का करतात? त्यांना खेळाचे व्यवसायमार्ग (Career) म्हणून आकर्षण का वाटत नाही? (ड)   शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या जातात, त्यामध्ये खेळ हा अविभाज्य घटक नाही का? (इ)    खेळ हा सक्तीचा विषय करता येऊ शकेल का? (ई)     पालकांचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक नाही का? (उ)    ...

कार्यसंस्कृती (Work Culture)

            कार्यसंस्कृती म्हणजे रे काय भाऊ? ( Work Culture) म्हटले की पटकन समजते. जशी प्रत्येक देशाची, कर्मचा-याची, संस्थेची, कंपनीची काम करण्याची कालांतराने एक पध्दत तयार होते तिला कार्यपध्दती म्हटले जाते. Standard Operating Procedure (SOP) किंवा Line of Action असे अनेक पर्यायी शब्द सांगता येतील.   प्रत्येक कामाला एक शिस्त, वळण आणि ते काम करणा-या व्यक्तीचा ठसा त्या कामावर उमटलेला असतो.   हळूहळू ते काम त्या व्यक्तीची ओळख बनून जाते.   काहीजण पटापट काम हातावेगळे करून मोकळे होतात. काहीजण जो पर्यंत कोणी सांगत नाहीत तोपर्यंत आराम करतात तर काहीजण इतरांची कामे स्वता:ची समजून उरकून टाकतात. काहीजण कामामध्ये शॉर्टकट मारुन लवकर कसे संपेल याचा विचार करतात तर काही जण सगळी कामे स्वता: केली तर चांगली होतात या विश्वासाने दुस-यांना सांगत नाहीत तर दुस-यांशी गोड बोलून काम हसत खेळत पार पाडून स्वत:च मोठेपणा घेणारे पण महाभाग असतात.            अशी ही कार्यसंस्कृती जगण्याचा एक अविभाज्य घटक बनून जातो ज्याला आपण नेहमीची (Routinue) सवय ...

भगिनीभाव जाणिला कुणी?

           आज मैत्रीचा दिवस. भाऊबीज, पाडवा, गुरुपोर्णिमा, राखीपोर्णिमा आणि इतर अनेक प्रसंगी सगळी नाती साजरी केली जातात. बहीणी-बहीणी मध्ये असलेले हे नाते मात्र विशेष कुणाच्या लक्षात येत नाही. तुम्ही म्हणाल, अहो, अप्रत्यक्षपणे त्यांचा सहवास/प्रेम लाभतेच की!   एकूणच बहिणीचे प्रेम,आस्था, आपूलकी, त्याग, मैत्री याबद्दल कमीच बोलले जाते. हेही नाते मला वाटते गृहितच धरले जात असावे. “आई-वडिलांनंतर मन मोकळे करण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे बहीण”असते.           कधी मैत्रीण,कधी ताई, आई प्रसंगी कठोर बनून बहीण किंवा भावाच्या पाठीशी ठामपणे उभी राह्णारी, प्रसंगी त्यागाची मुर्ती बनून त्याचा मोठेपणा न मिरवणारी, आलेल्या भावाच्या बायकांशीदुध्दा प्रेमाने वागणारी अशा अनेक रुपात ती वावरत असते पण आपल्या कधी लक्षात येत नाही. लहानपणी भांडणारी, पण तेवढीच हक्काने खाऊ खाताना बहिणीला/भावाला बोलावणारी, लग्नानंतर सासरी जाताना भावा-बहीणीच्या गळ्यात पडून रडणारी अशी अनेकांना आपआपली बहीण नक्कीच आठवत असेल. म्हणुन नेहमी वाटते, की एक तरी बहीण...