शिवकालीन रणरागिणी
रणरागिणी म्हणजे रणागंणात लढणारी शुर स्त्री,जी पराक्रम गाजवणारी,धाडसी आणि शुर असते. केवळ युद्धातच नव्हे तर समाजातील अं:धकार दुर करणे, गरजुंना मदत करणे, एखाद्या मोठ्या ध्येयासाठी समर्पितपणे कार्य करणार-या लढाई व धामधामूकीच्या कालावधीत खंबीरपणे वेळप्रसंगी स्वकिय आणि परकिय यांच्या समवेत विविध डावपेच लढवत, सहका-यांना आपलेसे करून उत्तेजन देऊन राज्यकारभार करणा-या स्त्रिलासुद्धा “रणरागिणी”असे म्हणतात. हा शब्द शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करतांना वापरला तर त्याकाळात जिजाबाई भोसले यांचा उल्लेख करणे अपरिहार्य ठरते. “शुन्यातुन विश्व निर्माण करणे”ही म्हण कदाचित त्यांचावरुनच तयार झाली असावी. त्यानंतरच्या काळात येसुबाई, ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी यासुद्धा रणरागिणीच ठरल्या आहेत. शिवकालिन“रण-रागिणी”हा विषय खरेच विचार करण्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा स्त्रीयांची उपजत लढाऊ वृत्ती दिसुन येते. ...