Posts

Showing posts from February, 2025

आध्यात्मिक वारी - भाग-3

Image
             लागोपाठ 3 वर्षे माझी आध्यात्मिक वारी झालेली बघून माझेच मला आश्चर्य वाटले. सन 2023 मध्ये गिरनार, सोमनाथ, द्वारका, 2024 मध्ये शेगांव, माहुर, शिर्डी,  शिंगणापुर आणि आता जानेवारी-25 मध्ये अक्कलकोट, गाणगापुर, तुळजापुर आणि पंढरपूर अशी वर्षाच्या सुरवातीलाच झाल्यामूळे खूप छान वाटले. आधीच्या वारीबद्दल त्या त्यावेळी लिहीलेच आहे. त्यामुळे पुन्हा लिहीत नाही.             कुर्ला येथील स्वामी समर्थ मठामार्फत 3 दिवसीय ही अध्यात्मिक यात्रा 5 जानेवारीला रात्री बसने सुरु झाली. माझा हा पहिलाच एकटीने आणि बसने प्रवास होता. त्यामुळे थोडी धाकधुक होती. सकाळी अक्कलकोटला पोहोचलो. तिथे भक्त-निवासमध्ये सकाळची सर्व कामे आटपून मठात गेलो. त्यानंतर 10 वाजता गाणगापुरसाठी ट्रॅक्स करुन 12 वाजता पोहोचलो. तिथे रांग खुप मोठी होती,काहीजणांनी पैसे देऊन दर्शन घेणयाचा प्रस्ताव मान्य केला. आम्ही दोघेजण मात्र एवढ्या लांब आलोच आहोत तर रांगेतूनच दर्शन घ्यावे या हेतुने रांगेत उभा राहिलो. तोपर्यंत बाकिचे सगळे जेवायला निघुन गेल...

खरे धर्मवीर कोण?

Image
           देव, देस आणि धर्मापायी जीव घेतला...         शुर आम्ही सरदार काय आम्हाला भिती..               हे गाणे ऐक्ल्यावर अंगावर रोमांच न उगवले तरच नवल!   अशा थोर ऐतिसासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेले आपण भारतवासी सध्या नक्की काय करतोय? याचा विचार करायला तरी कोणाला वेळ आहे का? गेल्या 700 वर्षांचा किंवा पुराणकालीन संदर्भ बघितल्यास सगळे देव, लोक, संत, ऋषीमुनी हे धर्मासाठीच लढलेले आहेत. आपल्या गीतेची तर टॅगलाइनच( घोषवाक्यच) आहे,” यदा यदाहि धर्मस्य...ग्लानीर्भवतू भारत” तेव्हा तेव्हा असेच धर्मवीर जन्माला येतात. शिवाजी महाराज, संभाजी राजे, भगतसिंह, गुरु गोविंदसिंह, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद,.. अशी अनेक नावे डोळ्यासमोर येतील. हिंदुस्थानाची ही परंपराच आहे. अनेक परकिय आक्रमणे या देशावर, धर्मावर झाली पण घट्ट पाय रोवून उभा असणारा आणि इतरांनाही सामावून घेणारा आपला हिंदू धर्माचे म्हणून तर परकियांना नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे.           ...