Posts

Showing posts from January, 2022

असाही एक पॉटलक (अंगत-पंगत)

Image
              शाळेत असताना एखाद्याने डबा आणला नसेल तर आमच्या बाई सगळ्यांना त्यांच्या डब्यातला एक घास   डबा न आणलेल्याला द्यायल्या सांगायच्या. तो प्रत्येकाचा एक एक घास बनून एवढा मोठा होत असे की त्याचे पोट भरुन इतर अनेकांचे पोट आरामात भरत असे.   त्या मिश्र खाण्याची मजा यायची.   वेगवेगळ्या चवी पदार्थ, प्रकार खावयास मिळायचे तिच गोष्ट बिल्डींग मधला एखादा मुलगा किंवा मुलगी काही कारणाने एकटी रहात असेल तर तिला / त्याला खाऊ देण्यासाठी वेगवेगळे प्रकार सगळ्या घरातून पोहचायचे. या सगळ्यांचे प्रेम बघून ती किंवा तो भारावून जात असे आणि वेगवेगळ्या चवी / पध्दत / प्रकार खाऊन समृध्दपण होत असे. त्याचाच परिणाम म्हणून तो किंवा ती अन्य वेळी इतरांना मदत करायला तत्पर असे.आता असे शक्यतो कोणी करायला जात नाही कारण खाजगीकरण हा मुद्दा अभिप्रेत असतो.            पॉटलकचा अर्थ असा दर्शवतो की विशेष तयारी न करता जे शिजवले जाईल ते अन्न परंतू मला वाटते ते असे नाही. यामध्ये प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार सोईनुसार ठरवून एका विश...

प्रजासत्ताकाच्या निमित्त्याने

Image
                     नुकताच 73वा  प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा झाला.  73 वर्षापूर्वी संविधान,  सार्वभौमत्व आणि लोकशाहीचा स्विकार करण्यात आला.  संविधानाची चौकट स्विकारुन मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करून घ्यावा याची ही एक कार्यपध्दती सर्वोनुमते स्विकारलेली होती.  प्रजासत्ताकाचे दुसरे महत्व म्हणजे स्वसंरक्षण, कायद्याने अधिकार आणि कर्तव्याची जाणीव तसेच अन्याय झाल्यास दाद मागण्याची सोय. सर्वसामान्य माणसे एवढा खोल अर्थ विचारात घेत नाही.  ज्यांना रोजची खाण्या-पिण्याची भ्रांत आहे त्यांना कोणते स्वातंत्र्य आणि कोणते प्रजासत्ताक ? ज्या दिवशी त्यांच्या मुलभूत गरजा संपूर्णपणे भागतील तो दिवस त्यांच्यासाठी मोठा.                 भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत. ·          समतेचा हक्क (कलम 14 ते 18) ·          स्वातंत्र्या...

पिया गये रंगून ..सायोनारा टेलिफून

Image
               दूरध्वनीद्वारे दूर राहणाऱ्या कोणाशीही बोलता येईल.आजकाल भारतातील कुठल्याही खेड्यात किंवा शहरात टेलिफोन खूपच सामान्य झाले आहेत. दूरध्वनी बहुतेक घरे, कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयात स्थापित आहेत. एकमेकांच्या संपर्कात राहाण्याकरता फार फार पुर्वी कबुतराचा किंवा अन्य पक्षांचा वापर व्हायचा (जे आता आपल्याला फक्त चित्रपटात बघायला मिळतं), त्यानंतरच्या काळात घोडयावरून माणसं पाठवली जायची संदेशवहनाकरता. एकमेकांचा आवाज एकमेकांना ऐकु येईल अशी कल्पना जेव्हां प्रत्यक्षात उतरली तेव्हां सामान्यांना तो आश्चर्याचा सुखद धक्का ठरला. ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट ज्यानं प्रत्यक्षात उतरवली त्या वैज्ञानिकाचं नाव आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल!              40-50 वर्षापुर्वीचे शमशाद बेगमचे हे गाणे मला खूप आवडते. त्यावेळी टेलिफोन होते का किंवा   सगळ्यांकडे नसावेत.   कुतुहल, आश्चर्य आणि आनंदमिश्रित या टेलिफोनचा उपयोग जेव्हा PCO पर्यंत पसरत गेला तेव्हा त्याचे महत्व खूप वाटायचे. टेलिफोन ए...

हिंदी भाषा आणि आपण

Image
                                        भाषा शरीर का ऐसा अदृश्य अंग है!                                        जिसमें इन्सान का सबकुछ दिखाई देता है ..              जागतिक हिंदी भाषा दिवस दि.10 जानेवारी,2022 रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला त्यानिमित्त हा लेखन प्रपंच. मराठावाडा, वाशी,लालबाग,महालक्ष्मी आणि वारंवार होणा-या शासकीय नौकरीमध्ये येणा-या माणसांशी, प्रवासात संवाद साधण्यासाठी पटकन हिंदी तोंडात येते. लहानपणापासूनची सवय मुंबईत आल्यावर जास्तच बळावत गेली, त्याची अनेक कारणे आहेत. जसे की, हिंदी चित्रपट,   गुलशन नंदा, मुन्शी प्रेमचंद हे साहित्यिक, कवी गुलजार, संत तुलशीदास, संत कबीर यांचे दोहे व काव्य आणि वेगवेगळे गझल गायक गुलाम अली आणि जगजीत सिं...

आधुनिक जिजाऊ आणि शिवबा / शिवानी

Image
           नुकतीच वीरमाता जिजाऊंची जयंती  (12 जानेवारी, 1598 ते 17 जून 1674 ) ही 12 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. राणीची बाग आणि व्ही.जे.टी.आय. कॉलेज यांचे इंग्रजी नाव बदलून वीरमाता जिजामाता असे ठेवण्यात आल्यावर कोण अभिमान वाटला. आम्ही फक्त तेवढेच करु शकतो, मानसिक समाधान किंवा पराक्रम काही नाही. असो.            जिजाऊंनी (प्रत्यक्ष नव-याची कोणतीही साथ नसताना) आदीलशाहीविरुध्द लढण्यासाठी स्वत:च्या मुलाला तयार केले होते,जे मोगल आणि इंग्रजांविरुध्दसुद्धा कामाला आले. सर्वगुणसंपन्न पुत्र स्वराज्यासाठी तयार करणे तसे सोपे काम नव्हते. तसा आराखडा तिच्या मनात होता म्हणून हे शक्य झाले. शिवबाने स्वत:ला   त्या आराखड्यास अनुसरुन घडवले आणि जिजाऊचे स्वराज्य-स्वप्न प्रत्यक्षात आणले.               आताच्या महिला परकीय आक्रमण, अंतर्गत सुरक्षा, कौटूंबिक सुरक्षा, सामाजिक समस्या सोडविण्यास सक्षम आहेत. तरीही लढा अजून चालूच आहे. अंतर्गत शत्रू आणि काळानुसार ...

लाईफ ऑफ पाय

Image
         “निरोप तुज देता” हे गाणे सैंनिकांसाठी असल्यामूळे ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते. असेही, निरोप देणे किंवा घेणे तसे अवघडच जाते. नुकताच “ लाईफ ऑफ पाय” हा हिंदी भाषेत डब केलेला इंग्रजी चित्रपट पुन्हा बघितला. मानव आणि प्राणी यांचा अथांग सागरात जगण्यासाठी एका लहान बोटीत केलेला संघर्ष याचे सुंदर चित्रीकरण आहे. एकूणच मांडणी, फोटोग्राफी आणि विषय मस्त होता. एक वेळ अशी येते, प्राणी मागे वळून न बघता शांतपणे दूर निघून जातो. आपल्या नायकाला मात्र खूप वाईट वाटते की वाघाने एकदाही मागे वळून पाहिले नाही म्हणून, इथेच ख-या अर्थाने चित्रपट संपतो. काही वेळा ही अलिप्तता आवश्यक असते असे मला वाटते.                 माणूस मात्र निरोप घ्यायला सहजा सहजी तयार होत नसतो. कधी कधी तर बाकीचे काही जण अप्रत्यक्षरित्या सुचवित असतात तरीही मोह,माया आणि पैसा माणसाला गुंतवून ठेवते. काही ठराविक जण ठराविक वयानंतर निवृत्त होवून निरोप घेतात. अपेक्षित साध्य साधल्यावर निवृत्ती / निरोप घेणे आणि दुस-याला जागा करून देणे हेच योग्य असते. यशाच्य...

नदी आणि मानव

Image
               त्यानंतर 30 वर्षानी डिसेंबर-21 मध्ये नाशिकला जाणे झाले. नाशिकला गोदावरी नदीचे मंदीर बांधलेले आहे. तसेच काठावर अन्नदान केले जाते तशीच गोदावरी नदीची ओटी भरुन पुजा केली जाते. सगळ्या आठवणी मनात पुन्हा: दाटून आल्या. गंमत म्हणजे जेव्हा आम्ही 1988 मध्ये हरिद्वार आणि ऋषिकेशला गेलो होतो तेव्हा गंगा नदीत मी स्नान केले नाही. चार थेंब डोक्यावर शिंपडून घेतले. त्याचे एक कारण माझी पाण्याविषयीची भिती आणि नदीची अवस्था (गर्दी, घाण, आणि सगळे विधी उरकणे इ.)  मात्र त्या  गंगा नदीचे रौद्र स्वरूप ऋषिकेशला बघायला मिळते. तशी एक बिहार मधील कोसी नदी “बिहारचे अश्रू” म्हणून ओळखली जाते,जिच्या पुराने कायम मनुष्य जीवन उध्वस्त होते. खरं तर याचे शास्त्रीय कारण हिमालयातील बर्फ उन्हाळ्यात वितळल्यामूळे सगळ्या उत्तरे कडच्या नदींना पुर येतो. हेच पाणी सपाट प्रदेशात मोठ्या प्रमाणात आल्यावर नदीचे पात्र बदलते त्यामूळे अनर्थ होतो. त्याऐवजी हेच पाणी योग्य ठिकाणी अडविले तर अनर्थ टळू शकतो. उत्तरेकडील नदी दक्षिणेला नदी जोड प्रकल्प राबविला असता तर दुष्काळी परिस...

बोलक्या वेदना

Image
                                              दु:खा पर्यंत येते ती आई                                             वेदना पदरात घेते   ती माई ..                      दि. 4 जानेवारी, 2021 रोजी, पद्मश्री “अनाथांची आई” सिंधू सपकाळ यांचे हद्यविकाराने निधन   झाल्याचे वृत्त कळले आणि मन सुन्न झाले.   एकीकडे दि.3 जानेवारी रोजी सावित्रीबाईचा जन्म दिवस साजरा करतो आणि दुस-याच दिवशी सिंधूताईंचे निधन व्हावे हा कोणता योगायोग समजायचा! एकीने मुलींनी शिकावे म्हणून जीवाचे रान केले तर दुसर...

विहीण बाई विहीण बाई उठा आता उठा

Image
                                       विहीण बाई विहीण बाई उठा आता उठा                                    भातुकलीचा सा-या तुम्ही केला चट्टा मट्टा !               हे आठवणीतील गाणी या सदरात ऐकल्यावर माझे मन बालपणात गेले.   शाळेत असताना माझी एक मैत्रिण हे गाणे हावभाव करून म्हणायची म्हणून फार मजा वाटायची. तेव्हा अर्थ कळत नव्हता पण भातूकली खेळताना किंवा कधी शाळेत वेळ असतांना म्हटले जायचे.          आता प्रत्यक्ष जीवनात आजूबाजूच्या विहीणबाई बघून कधी मजा कधी आश्चर्य  तर कधी दु:ख वाटते. विशेषत: एवढ्या तेवढ्या कारणांवरून रुसवे-फुगवे चालतात तेव्हा! खरं तर...

ममाज बॉय आणि गर्ल

Image
         ममाज बॉय ही एक पुर्वी सर्वसाधारण समस्या होती. आमच्या पिढीपर्यंत याचे खुप कौतूक झाले,करून घेतले,पण आताची पिढी तशी नाही. आता ममाज बॉय असते तशीच ममाज गर्लपण असते. मुली एक किंवा दोन असल्या तरी त्यांचे बरेच लाड होतात. तुलनात्मकदृष्ट्या पाहिले तर आधीच्या पिढीपेक्षा जास्तच. अर्थात त्या तशा असतात म्हणून लाड होतात मात्र कधी कधी हे लाड नंतर त्यांना स्वत:च्या आयुष्यात भारी पडतात.           आमच्या काळी वयाची 5 वर्ष झाली की, हळूहळू मुलींना कामाला लावणारे पालक (विशेषत: आई) “आज असू दे नंतर हॉस्टेल / नौकरीच्या ठिकाणी / सासरी   काम करायचे आहे ना” म्हणून काहीसे दुर्लक्ष करते. स्वत: नौकरीवाली असूनसुध्दा मुलांना किंवा मुलींना केवळ एकटे रहातात म्हणून कोणतीही झळ न पोहचू देण्याची खबरदारी बहूतेक नौकरदार पालक घेतात. यामूळे होते काय, ते आई-वडीलांना गृहितच धरायला लागतात. जेव्हा एकटे रहाण्याची वेळ येते तेव्हा खरी कसरत सूरू होते. त्यातही जेवणखाण, चालीरीती या सगळीकडे सारखे नसतात त्यामूळे त्यांना तडजोड करणे अवघड जाते.   ...