Posts

Showing posts from April, 2024

जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…

Image
                                    जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…           मध्यंतरी एक लेख वाचनात आला, “ जंगलाला धडकी भरलेली आहे, ” लेखाचा मतितार्थ असा होता की, आता सुट्ट्या पडणार आणि वेड लागल्यासारखी माणसे निसर्गाकडे/जंगलाकडे धावत सुटणार!  त्यामूळे जंगलातील रहिवासी, प्राणी, पक्षी, फुले, झाडे यांना त्याचा त्रास होतो. एकतर शांतता भंग पावते तर दुसरीकडे कचरा ,गोंधळ, आवाजामुळे त्यांना त्रास होतो, त्यांच्या नेहमीच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. जसे माणूस पाहूणा म्हणून कधीतरी गेला तर बरे वाटते. सारखे कोण ना कोण येतच राहिले तर घरातले सगळेचजण वैतागतात तसेच. काही घरात कायम ही सवय असते त्यांना काही फरक पडत नाही म्हणा !           पुर्वी सहसा माणसे कारणाशिवाय “ फिरायला ” म्हणून असे घराबाहेर पडत नसत.  प्रवासाची साधनेही नव्हती, पैसाही गाठीशी नव्हता. मला आठवते, वडील रेल्वेत आहेत म्हटले ...

रंग बरसे…..

Image
               ‘रंग बरसे’ हे गाणे आणि अशी अनेक गाणी होळीनिमित्त आपल्याला ऐकायला मिळतात. नवरंग मधले  “ जारे नटखट असु दे ”  नाहीतर मराठीतील “ खोडी कशी काढली.. ” “ रंगात रंगुनी.ऱाधा बावरी ” असू दे. रंगाचे महत्व तसेच कृष्णाचा खोड्करपणा अधोरेखीत करणारी ही गाणी ऐकून, बघून, नाचून वेड  लावतात. वर्षाच्या शेवटचा सण म्हणून ” होळी ”   रंगपंचमी साजरी केली जाते. कोकणी माणूस तर गणपती आणि होळीला गावी गेल्याशिवाय राहूच शकत नाही. एक निसर्गाची अवस्था ( येऊ घालणारी), थंडी कमी होते, पाने झ्डतात, नवीन पालवी फुटायची वेळ झालेली असते. रंगांची ओळख आपल्याला लहानपणीच करुन दिली जाते. त्याचे आकर्षण शेवटपर्यंत असतेच. शेतात धान्यपण (उन्हाळी) पेरा यची वेळ झालेली असते या सर्व हेतुने या सणाला विशेष महत्व दिसून येते. रंगाच्या दुनियेत माणुस, फुले, पाने, फळे,  पशु-पक्षीसुद्धा हरवून जातात. काही ठराविक रंग कोणाला आवडीचे असतात तर काही जणांना अजिबात आवडत नाहीत विशेष करुन काळा, तपकिरी, ग्रे. या रंगाशिवाय जगण्याची शिक्षा देव काहीजणाना  देतो तेव्हा वाईट वाटत...

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

Image
            नुकतीच एका घरगुती पार्टीला जाण्याचा योग आला नेहमीप्रमाणेच घरी बनवलेले कमी आणि बाहेरुन आणलेले/ मागवलेले जास्त असे अनेक पदार्थांची रेलचेल होती. सगळे काही झाल्यावर काही पाहूणे  थोडे उशीरा यावयाचे असतात त्यांच्यासाठी आणि स्वयंपाकाचे उरलेली सामान आवरण्याची गृहिणीची कसोटी लागते तेव्हा हा फ्रिज / शीतपेटी अगदी मदतीला धाऊन येते.  मोठे सामान मुकपणे सर्व काही पोटात सामाऊन घेत असतो.  तरी नाक मुरडणारे जेवण   “ थंडच होते हो ”  म्हणून सगळा मूड घालवणारेही कमी नसतात. वेळेवर सगळे मागवणे, वाढणे, फजिती  होऊ नये म्हणून आदल्या दिवशीच तयारी करुन ठेवणे. कच्चा माल तयार ठेवणे  (खोबरे किसून ठेवणे, मसाला वाटून ठेवणे, कोशिंबीर किसून ठेवणे, स्टार्टर कच्चे तयार ठेवणे..) अशा अनेक कामात मदत करणारा यांत्रिक मदतनीस आणि जेवण वाया जाउ न देणारा उपकारक/ देव म्हणून या फ्रिजचे  नक्कीच मोठे कौतूक वाटते.           आमचे घर मात्र या फ्रिजच्या बाबतीत उपाशीच राहत असावा. सकाळचे जेवण संध्याकाळी न खाणा-यांना...