Posts

Showing posts from June, 2021

मनी नाही भाव आणि “वडा”(देवा) मला पाव

              “मनी नाही भाव आणि वडा मला पाव” असा संत गाडगे महाराजांचा अभंग आपल्या अंधविश्वासावर मार्मीक टिका करतो. असेही आपण ब-याच गोष्टींचे अंधानुकरण करत असतो त्यातली ही   एक “वट पोर्णिमा” ज्यामूळे मूळ उद्देश बाजूला राहून नुसता दिखावा ठरतो. हल्ली सामाजिक माध्यमे तर यासाठी एक चावडी ठरली आहे. वेगवेगळे मिम्स, फोटो, रांगोळी, जिंगल्स, चॅट्स असे सगळे जण आपआपले हात धूवून घेतात.   त्यात हा विषय जिव्हाळ्याचा समजून पुरूष सुध्दा हिरहिरीने भाग घेतात याचे नवल वाटते. खरं तर वटपुजा करावी किंवा करु नये, केली तर कशी करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. केली तर अगदी साग्रसंगीत नाहीतर उगीच सात जन्म कशाला अडकवा असे म्हणून सोईस्कर रित्या दुर्लक्ष करणारे आहेत. पुरूषही तेवढीच आपली सुटका झाली म्हणून खूष असतात.                 मी आणि माझ्या आधीच्या पिढीने सर्व काही मनापासून आता पर्यंत केले. वातावरणही तसे पोषक होते. वडाची फांदी आणून पुजा करणे हा प्रकार पटत नाही. काही जण फोटोची पुजा कर...

पित्रृऋण

            फार वर्षापूर्वी सुधा मुर्तीची " पित्रृऋण " ही कादंबरी वाचली होती .  वडिलांचे राहिलेले कर्तव्य मुलगा वडिलांच्या अनुपस्थितीत   पार पाडतो . " छोटा बाप " म्हणून एका चित्रपटात छोटा भाऊ बहीणीचे लग्न करून देऊन बापाचे कर्तव्य पार पाडतो . “ पित्रऋण ” म्हणजे ज्या वडिलांनी आपल्याला या जगात आणले , ज्यांच्याशिवाय आपले अस्तित्वच शक्य नाही , त्यांचे आपल्यावर असलेलें उपकार म्हणा किंवा ऋण म्हणा ते काही अंशांनी परतफेड करणे प्रत्येक मुला - मुलीचे आद्य कर्तव्य आहे . आई वडिलांचे संस्कार , मेहनत , प्रेम मुलांकडून पुढे संक्रमित करणे , त्यात स्वत : ची भर घालून वाढ होईल असे वागणे अपेक्षित आहे . जेव्हां स्वत : कमविण्यासाठी वणवण करावी लागते तेव्हा वडिलांचे महत्व कळते .            पुर्वी हे पिढय़ा न पिढय़ा बिनधोकपणे चालत असें . आता   विभक्त कुटुंबांत हे शक्य करण्याकरता विशेष प्रयत्नं करावे लागतील . गांव सोडून आल्यान...

प्रसाद

                     देऊळ, पुजा आणि प्रसाद यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. लहानपणी बहुदा मी   प्रसादाच्या ओढीने देवळात जात असे.   प्रत्येक देवळाचे वैशिष्ठ किंवा वेगळेपण ते देत असलेल्या प्रसादातून जाणवायचे. आलटून पालटून बालाजी, मारूती, गणपती आणि देवी यांच्या देवळात जाणे व्हायचे. देव, पुजारी आणि भक्त यांचा त्रिवेणी संगम होऊन जे आपल्याला मिळते त्याला प्रसाद म्हणावयास हरकत नाही. देवाला अर्पण करायचा म्हणून पुजारी प्रसाद मनापासून बनवितो आणि भक्तीभावपुर्वक अर्पण करतो. देवाने खाल्ला म्हणजे तो चांगला असेल आणि देवाच्या कृपाप्रसादाने आपले चांगले होईल या भावनेने भक्त प्रसाद ग्रहण करतात त्यामूळे प्रसाद गोड लागतो. साधी सत्यनारायणाच्या पुजेच्या प्रसादाची शि-याची गोष्ट बघा. घरात आपण बनवतो त्या शि-याला ती विशिष्ट चव नसते. अगदी तस्साच बनविण्याचा प्रयत्न केला तरी ती चव येत नाही.                   तिरूपतीचा लाडू विशिष्ट चवीसाठी प्रसिध्द आहे. पुर्वी हा लाडू मोठ...

कर लो दुनिया मुठ्ठी मे!

                  जेथे जातो तेथे तु सांगाशी, चालविशी हाती धरोनिया ! हे तुकारामाने परमेश्वराला उद्देशून लिहलेला   400-450 वर्षापुर्वीचा अभंग आजही भ्रमणध्वनीच्या बाबतीत सार्थ ठरत आहे. 20-25 वर्षापुर्वी जर कुणी असे भविष्य सांगितले असते तर खरे वाटले असते का? की, हा आपला “जिवलग सखा, सांगाती, मनोरंजन, ज्ञानकौशल्य, प्रगणक,   घड्याळ, कॅमेरा,   इतर अनेक आघाड्यांवर मार्गदर्शक ठरेल म्हणून”.   गरीब, श्रीमंताचा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला, “मुर्ती लहान पण किर्ती महान” या सदरात मोडणारा झाला असे म्हणता येईल.   20 वर्षापूर्वी मला कार्यालयात पहिली पदोन्नती मिळाली तेव्हा मला आईने माझे कार्यालयीन फिरतीचे काम असल्यामूळे “मोबाईल घे” म्हणून सांगितले होते.   तो पर्यंत तो फक्त चालता फिरता फोन आणि महाग अशी त्याची प्रतिमा होती. त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा सन 2012 साली नव-याने आणल्यानंतर मी कित्येक दिवस वापरला नव्हता. मग मुली म्हणायच्या घेऊन जा, आणिबाणीत उपयोगाला येईल. तेव्हा मी ऑफीसला फोन म्हणून घेऊन जात होते. तो पर्यंत...

संस्कार शास्त्राचे महत्व

                                   संस्कार केले तर संस्कृती टिकेल!                                 संस्कृती टिकली तर धर्म टिकेल!                                धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल! -            अण्णासाहेब मोरे                  व्यक्तीवर अध्यात्मिक संस्कार करण्याचे ठरले तर ते बालवयात होऊ शकतात. ओल्या मातीतून मूर्ती घडविणे शक्य असते. मोठ्या मुलांवर, व्यक्तींवर संस्कार करणे ही अवघड,कष्टाची व विलंबदायक अशी बाब आहे. बालवयातील संस्कारांमूळे त्या बालकाचे भाव...

झुकझुक अगिनगाडी ....

                “झुकझुक अगिनगाडी   धुरांच्या रेघा हवेत सोडी, पळती झाडी पाहूया. मामाच्या गावाला जावूया.”   हे गाणे ऐकतच आपल्या सगळ्यांचे बालपण समृध्द झाले. या झुकझुक गाडीचे महत्व मला जास्तच वाटते कारण माझे वडील रेल्वेत होते. वयाच्या 25 वर्षापर्यंत जास्तीत जास्त प्रवास कर्मचा-यांच्या पासावर   होत होता.   अजूनही बहुतेक प्रवास रेल्वेने करण्यावर भर असतो. या प्रवासाची मजा काही औरच असते. आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य आणि प्रवासाचा कोणताही त्रास न होता अगदी वाजवी दरात कुठूनही, कुठेही आणि जलद व आरामशीर प्रवास करू शकतो.   सगळ्यात जास्त रेल्वेचे जाळे आपल्या भारतात आहे. रेल्वे   सुरु करण्याचे श्रेय इंग्रजांना जाते. यामूळे पर्यटन, दळणवळण आणि आणिबाणीच्या परिस्थितीत रेल्वेचे योगदान महत्वाचे ठरते. जसे की, पाणी एक्सप्रेस, ऑक्सीजन एक्सप्रेस, विज्ञान एक्सप्रेस, समझोता एक्सप्रेस इत्यादी. सिनेमा आणि नाटकातसुध्दा गाडीचा योग्य तिथे वापर करुन प्रेक्षकांना आकर्षित केले जाते. ट्रेन टू पाकिस्तान, बर्निंग ट्रेन, दी ट्रेन अशा अनेक चित्रपटातून रेल्वेचे ...

क्षणभर विश्रांती

                  “क्षणभर   विश्रांती” या नावाचे गोवा-मुंबई हायवेवर एक हॉटेल आहे. मला नांव ठेवणा-याचे खूप कौतुक वाटले. खरंच, क्षणभर थांबणे हे कोणत्याही लांबचा प्रवास करण्यामध्ये आवश्यक असते. प्रत्येक सजीव, निर्जिव वस्तूची, शरिराची, मनाची स्वाभाविक गरज असते. थोडे थांबून पुन्हा नव्या दमाने काम करायला ऊर्जा मिळते. कार्यालयात, मजुरांना मधली सुट्टी देण्याचा हेतूही हाच असतो.                 मध्यंतरी एका गाण्याच्या मैफिलीला गेले होते. कलाकाराने सुरुवातीलाच हात जोडून विनंती केली, कृपया आपलया भ्रमणध्वनीला “ क्षणभर विश्रांती” द्या. किती योग्य होते त्यांचे म्हणणे. आपण एवढे मग्न असतो, समोरच्याचा रसभंग होईल हेही आपल्या लक्षात येत नाही.               अध्यात्म्यातसुद्धा विश्रांतीला अत्यंत महत्व आहे. पुर्वीचे गुरुजन तर मौन पाळणे, शांत बसणे या गोष्टीवर जास्त भर द्यायचे. वैद्यकीयदृष्ट्या ठरावीक तास काम केले प...

आयुष्य एक कोडे

           !! युध्दिष्ठराला यक्ष प्रश्न विचारी जेव्हा ती होती प्राचीन शब्दकोडी             उत्तर सोपे पण प्रश्न कठीण भारी , माथा जवळ आहे पण वाट नागमोडी !!            अशी कविता व्हॉटसअपवर आली तेव्हा मजा वाटली . लहानपणची आठवण आली . मनोरंजन , चातुर्य आणि बुध्दीमत्ता अशा अर्थाने अनेक कोडी आपण तेव्हा सोडवली असतील . मोठे झाल्यावर स्पर्धात्मक परिक्षेत काही वेळा अशा प्रकारचे प्रश्न असतात . तेव्हा आपण अभ्यास करतो आणि कालांतराने विसरून जातो . गेट - टुगेदर , पिकनिक जेव्हा इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा या कोड्यांचे भरपूर देवाणघेवाण होत होती . एकाला कळले की , दुस - याला सांगण्याची भारी हौस असे .            काही जण पुर्वी मुद्दाम शब्द कोडे सोडविण्यासाठी म्हणून पेपर विकत घेत असत . त्यावेळी मला कोडी सोडविण्यात विनाकार...