स्थलांतरीत जीवन
दरवर्षी कित्येक मैल प्रवास करुन शिवडी,ठाणे येथे वेगवेगळे पक्षी( फ्लेमींगो,सिगल, माळढोक,..) येतात आणि आपण मुद्दाम त्यांना पाहायला आपण देखील जातो. काय असेल ना त्यांची जिद्द,चिकाटी कि हवामानामुळे नाईलाज म्हणुन येत असावेत. शासनातर्फे,वेगवेगळ्या राज्यांतर्फे,देशातर्फे अशी पक्षी,प्राण्यांची देवाणघेवाणही आपापसांत होत असते. जसे राणीबागेत पेग्विन आले किंवा चित्ते, सिंह यांनाही बाहेरुन आणले जाते. एकतर त्यांची पैदास येथे होऊन इथला निसर्ग समतोल राखला जावा तसेच आपापसातील राजकीय,आंतर-राष्ट्रीय संबंधही प्रस्तावित व्हावेत हाही एक हेतु असतो. नेहरुंनी तसे एक हत्तिचे पिल्लू जपानला भेट दिले होते म्हणे. तर असे हे प्राणी-पक्षी आणि माणुससुद्धा स्थलांतर करीतच असतो. गरिबी हे एक प्रमुख कारण असले तरी आरोग्यसेवा आणि शिक्षण सुविधांचा आणि वाढती लोकसंख्या असे इतर घटक लोकांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त करतात. नैसर्गिक आपत्ती जसे कि, पुर,चक्रिवादळ,दुष्काळ,भुकंप व अशांतता( दहशतवाद) हेही कधी कधी मानव व पशु-पक्षी स्थलांतरास भाग पाडतात. ...