वनसंवर्धन -एक काळाची गरज
नुकताच ॲमेझॉन टिव्हीवर “शेरनी” चित्रपट पाहिला. वन अधिकारी (विद्या बालन), वाघीण, स्थानिक राजकारण, शिकारी यांच्यातला संघर्ष मांडला आहे. त्यात शेवटी वाघीणीचा बळी जातो. समाधान एवढेच की तिचे दोन बछडे वाचतात. जेव्हा जेव्हा आम्ही पर्यटनाला जातो तेव्हा जंगल हा एक अनिवार्य बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामूळे आतापर्यंत बरीच जंगले बघून झाली. पिलभित टायगर रिझर्व, ताडोबा चंद्रपूर, बांधवगड नॅशनल पार्क (मध्यप्रदेश), कुंभलगड वाईल्ड लाईफ (उदयपूर, राजस्थान) असे बाहेरचे आणि मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, राणीबाग, नित्याचे. पुर्वीचे वैभव आता दिसून येत नाही पण अजूनही मुंबई हिरवी दिसते ती यामूळेच. आपण विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली. डोंगर फोडले, नद्या वळविल्या, त्यांच्यावर धरण बांधले, समूद्रावर सेतू बांधले म्हणजेच कोठेतरी निसर्गावर आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करतो. खरेच शक्य आहे का ते? निसर्गापेक्षा आपण बलवान होऊ शकतो का? साधे झाडाचे उदाहरण घ्या. एक झाड लावले तर त्याच्यापासून ऑक्...