महाभारतातील व्यक्तीरेखेंतुन आपण काय शिकायचे?
म हाभारत हे एक प्रतिसृष्टी वाटण्याइतपत निर्माण झालेले आहे असे वाटते. कधी कधी हे माणसांचेच जग असुन त्यात माणसांचेच मनोव्यापार दिसतात. यातल्या अनेक व्यक्तिरेखा आजही आपण बघत असतो. मनात पीळ हवा पण अहंकार नको, प्रामाणिकता हवी पण दुष्टता नको हेच या सर्व व्यक्तिरेखा दर्षवितात म्हणुनच त्या आजही वाचाव्याशा वाटतात.त्यावर लिहावेसे वाटते, ऐकावेसे वाटते, पहावेसे वाटतेपुन्हा पुन्हा. माणसांच्या स्वाभाविक वृतींचाच हा एक चित्रपट भासतो. त्यातुनच जगण्याचा,झुंजण्याचा मार्गही दिसतो. अशा अनेक व्यक्ती/प्रसंग व्यावहारिक जगाचा आरसा दाखविणारे तर भावना, कर्तव्य, निष्ठा, दु:ख, सोशिकता असे अनेक गुणही महाभारतात आढळतात. पुढिल 4 महिन्यांत प्रत्येक आठवड्याला एक असे व्यक्तिमत्व लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. या वर्ष अखेरपर्यंत पुर्ण होईल किंवा नाही ते सांगता येणार नाही पण हा प्रवास असाच पुढे चालु राहील. यामध्ये स्त्री-पुरुष दोघांचाही विचार करण्यांत येणार आहे. यासाठी लागणारे संदर्भग्रंथ:- पंचनायिका आणि शक्ती- वसंत कडेकर आणि डॉ.पोतदार 2...