Posts

Showing posts from December, 2021

ll चाहसे चाय पिलाओ ll

Image
               आमच्या ऑफिसमध्ये एक जण ऑफिसमध्ये प्रत्येकाकडे आला की, ll चाह से चाय पिलाओ ll असे म्हणायचा. या गोष्टीला आता 28 वर्ष झाली तरी त्याचे अजून तेच वाक्य ठरलेले आहे. ऐकायला मजा वाटते आणि मनात असूदे किंवा नसूदे दादही द्यावीच लागते (चहापण द्यावाच लागतो).असो.  “पिनेवाले को पिनेका बहाना चाहिये” या उक्ती नुसार काही जण काहीही कारण नसले तरी, चहाची फरमाईश करणारी माणसे ही घरी, दारी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आढळतात. चहा पिऊन झोपणारी माणसेसुध्दा बघितलेली आहे. मी स्वत: तेवढी काही चहाभोक्ती नाही. सकाळी एकदाच चहा पिते, ऑफिसमध्ये कॉफी पिते,त्यामूळे मला चहा करण्याचा कंटाळा येतो.  लहानपणापासून लग्न होईपर्यंत मी कधीही चहा पिलाच नव्हाता.           माझ्या घरासमोरच्या एका मंदिरात गेल्यावर चहा पिण्यासाठी देतात.   ऐकून आश्चर्य वाटेल पण यांना चहा भारी आवडतो. ( जोडप्यामध्ये आवडसुध्दा एक नसावी ही परमेश्वरी योजना असावी ) हे कधीही चहा प्यायला तयार असतात,चुकुनही कोफी पिणार नाहीत, वरुन म्हणणार की, मला कोणते...

गीताई आणि आपण

Image
               || जीवन पध्दतीचे सर्व सार   ज्यात समाविष्ट आहे,                   त्या पवित्र श्रीमद् भगवतगितेला नमन! ||             नुकताच गीतेचा जन्मदिवस यंदा दि. 14 डिसेंबर रोजी साजरा झाला.   मार्गशीर्ष शुध्द एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला कुरुक्षेत्रावर भगवदगीता सांगितली होती,जी आजही सर्वांना कोणत्याही समस्येवर मार्गदर्शक ठरते. हा एक केवळ धर्मग्रंथ नसून आदर्श जगण्याचा वस्तूपाठ आहे. जेव्हा जेव्हा आपले मन अशांत असते तेव्हा तेव्हा या ग्रथांच्या वाचनाने मन:शांती लाभू शकते. माझे वडील म्हणायचे रोजच “गीता वाचा” आपोआप उत्तरे मिळत जातील आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू. ते स्वत:सुद्धा काही प्रमाणात गीता आचरणात आणत होते.             शाळेत असताना एखादा अध्याय पाठांतरासाठी किंवा त्यावरचे लेखन एवढीच मर्यादित गीताईची ओळख झाली होती. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक ट...

येथे ओशाळला मृत्यू

Image
            “येथे ओशाळला मृत्यू”हे नाटक मी पहिल्यांदा बघितले तेव्हा मनावर प्रचंड दडपण आल्यासारखे वाटले. संभाजी राजांचे देशप्रेम,जाज्वल्य धर्माभिमान आणि जिद्द यांचा अनोखा संगम अत्यंत प्रभावीपणे नाटकात दाखविला होता. नाटकात काम करणारे पण एकाहून एक मातब्बर होते.   अशी नाटके खरंतर मुलांना पुन्हा पुन्हा दाखवून प्रेरीत केले पाहिजे असे वाटते.           मृत्यूची कल्पना कोणालाही असह्यच असते. इच्छामरण “हवे की नको”यावर जरी मतभेद असले आणि प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले, तरी त्यावर आपण कोणतेही आणि काहीही भाकित करु शकत नाही. पुराणकाळात दिव्यदृष्टीने किंवा दिलेल्या शाप किंवा वरामूळे त्या व्यक्तीचा मृत्यू तसाच घडून येत असे, जसे की, भस्मासूर, रावण, कर्ण, आणि कृष्ण इत्यादी. एक कथा म्हणून किंवा जूने संदर्भ म्हणू सोडून देऊ शकतो पण आता वारंवार घडणारे अपघात, सैनिकांवर होणारे हल्ले, घातपात किंवा परकीय छुपे हल्ले यांना काय म्हणाल?               खरंच आपण बेजाबदार आहोत का? पुढे होऊ शकण...

चुकीला क्षमा नाही पण करावी लागते

Image
             “चुकीला क्षमा नाही”हा एका चित्रपटातील अभिनेत्याचे प्रसिध्द संवाद आहे. कधी कधी गमतीने म्हटले जाते तेव्हा त्याचे गांभिर्य जाणवत नाही परंतू जेव्हा वैयक्तिक किंवा सामाजिक आयुष्यात त्याचे प्रत्यंतर येते, तेव्हा खरच विचार करायला भाग पडते. 1) वर्षानुवर्ष घरकाम करणारी बाई जेव्हा मालकीणीच्या घराची परस्पर दुय्यम चावी बनविते. 2) वडीलांनी मुलांच्या नकळत्या वयात “दुसरी आई” आणल्याचा राग मनात ठेऊन वडील गेल्यावर तात्काळ घर सोडले. 3)   सासूचे टक्के-टोणपे सहन करून जेव्हा मुलांवर अन्याय होतो तेव्हा घर सोडणे किंवा वेगळे होणे. 4) सामाईक हिस्सा असतानासुध्दा एक हिस्सा परस्पर विकून आलेला पैसा गिळंकृत करून त्याचा कोणताही पुरावा ठेवला नाही. 5)   मोठेपणाच्या ओझ्यातून बाहेर न पडता लहान भावंडे नेहमीच हाताखाली रहावीत अशी अपेक्षा धरणारी मोठी माणसे. 6) अनुकंपा तत्वावर नातेवाईकांना दिलेले घर त्या नातेवाईकाची दुसरी पिढीसुद्धा सोडायला तयार नसणे. 7)   मुलगा किंवा मुलगी न सांगता परस्पर लग्न करुन येतात.     ...

ध्यानधारणा

Image
            “सुंदर ते ध्यान विटेवरी उभे ..” नुकतीच कार्तिकी एकादशी होऊन गेली त्या निमीत्त अनेक विठ्ठलाची गाणी ऐकावयाला मिळाली. आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत आपला चातुर्मास बहुतेक जण पाळतात. काही जण मांसाहार, कांदा, लसूण सुध्दा सोडतात. तर काही जण देवाचे काही तरी नवस, उपवास तिर्थयात्रा करून आयुष्यभराचे पुण्य कमवायचा प्रयत्न करीत असतात.                   या सर्वामागे मूळ प्रेरणा शांती व समाधान प्राप्त करणे हा असतो हीच मनोकामना मनात धरून ध्यान केले जाते.   योगामध्ये अनेक प्रक्रियेद्वारे मनावर ताबा कसा मिळवायचा ते शिकवले जाते. ब्रम्हविद्येत श्वासावर नियंत्रण मिळवून “शांती, समाधान, आरोग्य “ कसे साध्य करावयाचे ते शिकवतात.   आताच्या धावपळीच्या युगात ध्यानधारणा करणे अत्यंत गरजेचे झालेले आहेत. कायम ताणतणाव, स्पर्धा आणि यशासाठी केलेली धावपळ यामूळे माणूस कुठेतरी थकतो. अतिश्रमाने आणि अतिताणाने एकवेळ अशी येते की सर्व काही अचानक थांबते. यासाठी ध्यानधारणा ही एक सोपी, बिनखर्च...

गावची जत्रा

Image
           नुकतीच जत्रेसाठी गावी जाऊन आल्यावर एक आठवडा तरी गावचा हॅंग ओव्हर कायम असतो. मग “ परत येरे माझ्या मागल्या” (दैंनंदिन आयुष्य सुरू) माझे पती 26 वर्षांनी आणि मी   6 वर्षांनी   आंगडी (कारवार), कर्नाटक येथील “शिवनाथ” जत्रेसाठी गावी गेलो होतो.   2 वर्ष कोठेही जाता न आल्यामूळे जरा चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. जत्रेला जातच आहोत तर कुलदेवता दर्शन (श्री. महालसा), फिरणे आणि जत्रेला हजर रहाणे असा त्रिसुत्री कार्यक्रम   हा दहा दिवसांत पुर्ण करावयाचा होता.   फिरायचे नियोजन करण्यात आमचे “हे” हुशार. त्यानुसार सगळा कार्यक्रम पार पडला आणि 10 व्या दिवशी मुंबईत जान आणि सामानासह सुखरुप परतलो.           गावची जत्रा म्हणजे एक पर्वणी असते. दिवाळीनंतर 20-22 दिवसांनी येणा-या जत्रेचा उल्हास, आनंद, सजावट, किर्तन, फटाके (वजन),   पुजा-आरती आणि जेवण काही औरच असते. दुस-या दिवशी तुलाभार, लिलाव, दही काला, शिवभूषण पुरस्कार,   ग्रामस्थांची सभा घेऊन जत्रेची सांगता होते. प्रत्येक जण प्रत्ये...