विना सहकार नाही उध्दार
“ विना सहकार नाही उध्दार” हे आपले परवलीचे वाक्य इसवी सन 60च्या दशकातले होते. ब-याच गोष्टी आपण सहकारी तत्वावर राबविण्याचा प्रयत्न केला, अजूनही करीत आहोत,याला म्हणावे तसे यश मिळत नाही. खरं तर मिश्र अर्थव्यवस्था आपण स्विकारली तेव्हाच अप्रत्यक्षपणे मान्य केलेले होते की, खाजगी आणि सरकारी तत्वे दोन्ही एकमेकास पुरक तर्हेने अंमलात आणली जातील. या दोघांचे काही तोटे लक्षात घेता तिस-या तत्वाची अमंलबजावणी करणे गरजेचे ठरले कारण आपली लोकसंख्या, कमी पैसा आणि बुध्दीमत्ता व कौशल्य यांची अमाप उपलब्धता. सहकार ही एक चळवळ असुन अगदी तळागाळातल्या लोकांपासून सुरू करणे शक्य असलेली योजना आकर्षक वाटते,कारण त्यात अनेकांचे अनेक स्तरांवर भले होणार असते. कोणत्याही चांगल्या योजनेचे भवितव्य ठरविणे, त्याच्या प्रामाणिक हेतूवर आणि अंमलबजावणीवर अवलंबून असते. या आघाडीवर आपण अनेकदा कमी पडतो. स्वार्थ बळावला की, अशा छोट्या पातळीवरच्या योजना हमखास बारगळतात. जो इस्त्रायल...