जेव्हा रायगडाला जाग येते...
“जय जय महाराष्टृ माझा ...“ या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाल्यावर खुप अभिमान वाटला. आता सगळ्या शासकीय कार्यक्रमातून हे गीत वाजविले जाते. लहानपणी हे गाणे ऐकल्यावर जसे स्फुरण चढत असे तसे मात्र आता होताना दिसत नाही. एक औपचारिकता म्हणून केवळ हे गाणे वाजविणे आणि गाणे वाजविल्यामूळे महाराष्टाचा खराच अभिमान वाटतो का? ही एक विचार करण्याची गोष्ट आहे असे मला वाटते. मला कळायला लागल्यानंतर पहिले ऐतिहासिक नाटक पाहिले होते, ते होते “जेव्हा रायगडाला जाग येते.” खुले रंगमंच, प्रभाकर पणशीकर यांचा अभिनय, आवेश आणि एकूणच ऐतिहासिक संदर्भामुळे या नाटकाने मनावर कायमचा ठसा उमटविला होता. कित्येक दिवस मनामध्ये नाटकाचे संवाद रेंगाळत होते. नुकताच रायगडाचा व्हिडिओही बघण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. आता याची आठवण येण्याचे कारण आम्ही नुकतीच रायगड किल्याला दिलेली भेट. मुंबई ते संदोशी एसटीने मुंबईवरून रात्रीचा प्रवास केला. भल्या सकाळी रायगड्याच्या पायथ्याशी पोचलो. तेथून बसने रायगड रोप वे ग़ाठला. महाड वरून सुध्दा रायग़डवर जाण्याची व्यवस्था होऊ श...