आयत्या बिळावर नागोबा.
माझ्या मैत्रीणीचा नवरा कायम मैत्रीणीला बसून खाते म्हणून चिडवत असतो तरी बरे बायको नौकरी करणारी आहे. इतर गृहीणीबद्दल काय बोलला असता? बसून खाणे म्हणजे काय हे मला कळले नाही. माझ्या मते काहीही काम न करता “आयत्या बीळावर नागोबा” या अर्थाने असावे पण आपल्या सारख्या मध्यम वर्गात असे बसून खायला कोणालाच मिळत नाही. काहीना काही तरी काम करावेच लागते अपवाद फक्त लहान मूले, दिव्यांग आणि म्हाता-या माणसांचा असावा. पिढीजात श्रीमंत असणारेसुध्दा दुस-यांना असे कधी म्हणत नसतील.
त्यामूळे “बसून खाण्याचे” स्वप्न कुणी
पाहू नये ते पुर्ण होण्याची शक्यता नाही, ही अपेक्षा ही कधी ठेऊ नये. काही लोक भाग्यवान असतात ज्यांना आयते सर्व मिळते
ज्यामूळे पुढील सर्व कार्य पुढे नेणे सोपे जाते पण कुणीतरी आधीच्या पिढीने किंवा
दुस-याने कष्ट ओतलेले असतात त्यासाठी. तीच गोष्ट नुकत्याच पकडलेल्या “स्टार
पुत्राबद्दल”, त्यालाही सर्व आयते मिळत होते,फक्त सांभाळावयाचे की उडवायचे हे
ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न म्हटला तरी अप्रत्यक्षरीत्या तो समाजाशी बांधील
असतो. त्यामूळे आयते मिळाले तरी “लाभते”
असे नाही. जे मिळाले ते टिकविण्यासाठीसुध्दा किंवा त्यात भर घालण्यासाठी तुम्हाला
त्यात स्व:ताचे योगदान द्यावे लागतेच.
“आयजीच्या जीवावर बायजी उदार” अशी एक
म्हण आहे, म्हणजे आपल्याला फुकट मिळालेच आहे त्यातला थोडासा वाटा इतरांना देऊ असा
दृष्टीकोन. हे काही चुकीचे नाही पण स्व:ताच्या हिस्स्याचे देणे वेगळे आणि कुणीतरी
दुस-यांनी दिलेल्या कमाईचा वाटा तिस-यांना देणे वेगळे, असे अनेक पैलू या बसून
खाण्याचे आहेत. ब-याच महिला कामाला नौकर ठेऊन स्वत:ला आराम मिळेल असा विचार करतात,
मात्र त्या नौकरांकडून हवे तसे काम करून घेणे आणि ते तसेच होईल अशी अपेक्षा न ठेवणे.
शिवाय त्यांना आपुलकी, गरज निर्माण होईलच असे नाही, शेवटी पैसे देऊन केलेल्या
कामाला आपलेपणा कसा असणार? हल्ली सगळे विकत
मिळते म्हणून शक्यतो घरी पदार्थ करणे टाळले जाते. स्वच्छता,भेसळ, चव आणि
आरोग्यवर्धक जेवढे घरी बनविलेले असते तेवढे बाहेरच्या पदार्थात असते का? याचा
विचार केला पाहिजे.
“बसून खाणे” आरोग्याच्या दृष्टीने योग्य
आहे. मग ते थोडे का होईना पण चांगले खाणे महत्वाचे आहे. शारिरिक हालचालसुध्दा
तेवढीच आवश्यक आहे. अन्यथा अनेकविध आजार जडतात विशेषत: महिलांना याचा जास्त त्रास
होतो म्हणून खाण्याच्या बाबतीत तरी बसून खाणे योग्य आहे. त्यानंतर चालणे, थोडा
व्यायाम हा करावाच लागतो. यासाठी मला आता असे वाटते शाररिक तंदुरूस्तीसुध्दा
शासनाने गंभीरतेने आणि स्वत: कर्मचा-याने सुध्दा याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला काय वाटते?
Comments
Post a Comment